कुरुंदवाड : जमीर पठाण : हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशात स्वागत होत आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजाने विधवा प्रथा बंदच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. पती मृत झाल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे अशा कुप्रथा बंद करून निर्णायक पाऊल उचलल्यामुळे या लढ्याला यशस्वी करण्यासाठी चर्मकार समाजाने पहिले पाऊल उचलले आहे.
हेरवाड येथे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला; पण तो अंमलात आणणे तेवढेच आव्हानात्मक आहे. मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगोंडा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व चर्मकार समाजातील पदाधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी केली आहे. हेरवाड येथील विष्णू गायकवाड (वय ६० ) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. पदाधिकार्यांनी माने यांच्या घरी जावून विधवा प्रथा बंदीबाबत प्रबोधन केले. महिलांना सर्वांबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे चर्मकार समाजाने ही प्रथा बंद करुन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गायकवाड कुटुंबीयांनी आणि चर्मकार समाजबांधवांनी ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची सुरवात आम्ही करत असल्याचे सांगितले. विधवा महिला प्रथा बंदीच्या क्रांतिकारी ज्योत चर्मकार समाज बांधवांनी सुरू केल्याने समाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचलंत का?
हेरवाड गावाने ग्रामसभेमध्ये सर्वानुमते विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. या ठरावाला जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर चांगल्या प्रकारे बळ मिळाले आहे. हेरवाडचे ग्रामस्थ विष्णू गायकवाड यांचे निधन झाले. अशा दु:खाच्या क्षणात गायकवाड कुटुंबीयांनी व चर्मकार समाजबांधवांनी ठरावाची अंमलबजावणीची सुरुवात करून ऐतिहासिक निर्णयाला बळ दिले आहे.
– सुरगोंड पाटील (सरपंच)हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांना इतर महिलाप्रमाणे मान-सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून विधवा प्रथा बंदीचा घेतलेला निर्णय घेतला. हा निर्णय देशपातळीवर राज्यपातळीवर कौतुकास्पद झाला आहे. या निर्णयाला समस्त चर्मकार समाज बांधवांनी मान्य करत या निर्णयाची समाजाने सुरुवात केली आहे.
-अर्जुन जाधव.