पुणे : पुढारी वृत्तसेवा : साखर आयुक्तालयाच्या सोमवारच्या (दि.13) अहवालातील माहितीनुसार ऊस गाळप हंगामाचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार राज्यात आतापर्यंत 1320 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून 137.27 लाख मेट्रिक टनाइतके उच्चांकी साखर उत्पादन झाले आहे.
राज्यातील ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये सोलापूरमधील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने 24.78 लाख मेट्रिक टनांइतके सर्वाधिक ऊस गाळप आणि 23 लाख 45 हजार क्विंटलइतके सर्वाधिक साखर उत्पादन घेत अग्रस्थान पटकाविले आहे. साखर उतार्यात सर्वाधिक 12.99 टक्के उतारा मिळवित कोल्हापूरमधील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी कारखान्याने प्रथम क्रमांक पटकविला.
विशेष म्हणजे साखर उतार्यात पहिल्या 10 कारखान्यांमध्ये 7 कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्ह्यातील एक आणि सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा यात समावेश आहे.
गाळप हंगामाची सांगता पुढील दोन दिवसांत होण्याची अपेक्षा असून उच्चांकी ऊस गाळप, साखर उत्पादनाचे हे ऐतिहासिक वर्ष ठरले आहे. 13 जून उजाडूनही मान्सूनची हजेरी नसल्यामुळे अद्यापही शिल्लक उसाचे गाळप सुरूच राहिल्याचे सांगण्यात आले. तर पहिल्या दहा कारखान्यांत सर्वाधिक ऊस गाळप आणि साखर उत्पादनात पुणे जिल्ह्यातील बारामती अॅग्रो आणि 'माळेगाव सहकारी'ने स्थान मिळविले आहे. साखरेचा सरासरी उतारा 10.40 टक्क्यांइतका हाती आला आहे. 200 पैकी 199 कारखाने बंद झाले आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी कारखान्याकडून (ता. भोर) सुरू असलेले ऊस गाळप पुढील दोन दिवसात बंद होण्याची अपेक्षा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी – 12.99 टक्के, श्री पंचगंगा सहकारी- 12.90 टक्के, सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी- 12.66 टक्के, सांगलीतील राजाराम बापू पाटील सहकारी- 12.65 टक्के, सोनहिरा सहकारी- 12.54 टक्के . (उर्वरित सर्व कोल्हापूरमधील) अथणी शुगर लिमिटेड -12.51 टक्के, ओलम अॅग्रो इंडिया लि.- 12.51 टक्के, भोगावती सहकारी -12.50 टक्के, कुंभी-कासारी सहकारी – 12.44 टक्के, इको केन एनर्जी लिमिटेड – 12.38.
ऊस उत्पादक शेतकर्यांनी उत्तम प्रकारे ऊस उत्पादन घेतले आणि निसर्गाने चांगली साथ दिल्याने देशात महाराष्ट्राने ऊस गाळप, साखर उत्पादनात पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळविला आहे. संपणार्या ऊस गाळप हंगामात निश्चितच काही अडचणी आल्या तरी शासनाने संपूर्ण उसाचे गाळप करण्यास प्राधान्य दिले. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात किसनवीर सहकारी कारखान्याच्या क्षेत्रात गाळपाविना ऊस उभा असून प्रादेशिक साखर सहसंचालक व कारखान्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात अन्यत्र असणार्या उसाची नेमकी स्थिती पुढील दोन दिवसांत स्पष्ट होईल.
– बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र.
जिल्हा साखर कारखान्याचे नाव ऊस गाळप (लाख मे.टन)
जिल्हा साखर कारखान्याचे नाव साखर उत्पादन (लाख क्विंटल)