अहमदनगर

कोपरगाव शहरासाठी आपला दवाखान्याचे केंद्र मंजूर : आ. आशुतोष काळे

अमृता चौगुले

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून नागरिकांना आजारावर वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त लोकसंख्या असलेल्या कोपरगाव शहरी भागासाठी आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मिळावे, यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून कोपरगावात गांधी नगर, दत्तनगर, हनुमान नगर, इंदिरा नगर, गोरोबा नगर या भागासाठी महायुती शासनाकडून आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मंजूर झाल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगावच्या दिवसेंदिवस वाढलेल्या लोकसंख्येमुळे सर्वच नागरिकांना वेळेत चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी आ. काळे यांची नेहमी धडपड सुरु असते. वाढत्या शहरीकरणामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यात आरोग्य यंत्रणेवर काहीसा ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत. उपचार घेताना कोणत्याही अडचणी येवू नये, यासाठी आ. काळे यांच्या अथक प्रयत्नातून श्रेणीवर्धन होवून ग्रामीण रुग्णालयाला 100 बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला.

तरीदेखील राज्य व केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांचा जास्तीत- जास्त फायदा मतदार संघातील जनतेला मिळवून देण्यासाठी आ. काळे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या एन.यु.एच.एम.अर्थात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कोपरगावातील नागरिकांसाठी यापूर्वी 3 अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करून आणले. या माध्यमातून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा दिली जाते, परंतु कोपरगावातील अधिक लोकसंख्येच्या भागासाठी आरोग्य वर्धिनी केंद्र मिळावे, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.

यातून कोपरगावात गांधी नगर, दत्त नगर, हनुमान नगर, 105 गोरोबा नगर या जास्त लोकसंख्येच्या भागात नागरिकांसाठी महायुती शासनाकडून आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मंजूर करून घेतलेे. या आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये प्रत्येकी एक एम.बी.बी.एस. डॉक्टर, कर्मचारी परिचारिका, आरोग्य सेवक, परिचर फ,कार्यरत राहतील. आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल नागरिकांंनी आभार मानले.

रुग्णांचा आर्थिक खर्च निश्चितपणे कमी होणार!

यातून कोपरगावची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रांद्वारे रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातील. नागरिकांचा आरोग्यासाठी करावा लागणारा आर्थिक खर्च निश्चितपणे कमी होणार असल्याचे आ. आशुतोष काळे म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT