Latest

Weather forecast : थंडी होणार गायब; वायव्य, मध्य भारतासह राज्यातही तापमान वाढणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या काही दिवसांत मध्य भारतासह राज्यातील तापमानाचा (Weather forecast) पारा वाढणार असून, बोचरी थंडी गायब होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. सध्या भारतासह राज्यात सकाळी थंडी आणि दुपारी कडक उन्हाळ्यासारखे ऊन जाणवत आहे, त्यामुळे उन्हाळ्याचे वेध लागण्यास सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या चार ते पाच दिवसांत वायव्य भारतासह पूर्व भागातील किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ (Weather forecast) होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मध्य भारतासह महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमान देखील २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढणार असून थंडी गायब होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने म्हटले आहे.

सध्या उत्तर भारतात किमान तापमान 10-12 अंश आहे. येत्या ४-५ दिवसांत संपूर्ण वायव्य भारतात देखील तापमान वाढेल (Weather forecast) तर १८ फेब्रुवारी रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या उंच भागात हलकी बर्फवृष्टी होऊ शकते, अशी माहिती IMD दिल्लीचे वैज्ञानिक डॉ. नरेश कुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT