पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेताकुटीला आणला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या 'X' खात्यावर एक पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आपल्याला काय ? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला आहे." वाचा सविस्तर बातमी. ( Vijay Wadettiwar)
संबधित बातम्या
राज्यभर पाऊस असंतुलित पडल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या 'X' खात्यावर एक पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
"महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही हा प्रश्न आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये राज्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचे प्रमाण वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे. आपल्याला काय? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला आहे. असे म्हणतं वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा