पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीची प्रसिद्ध अदाकारा वैशाली ठक्करने गेल्या शनिवारी गळफास घेवून आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्य पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीतून उघड होत आहेत. याच दरम्यान वैशालीच्या मृत्यूचे कारण तिचा शेजारी आणि एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी असल्याचे समोर आले. ही घटना घडल्यानंतर राहुल हा त्याची पत्नी दिशासह फरारी झाला होता. परंतु, इंदूर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर वैशालीच्या ( Vaishali Takkar) एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानीला अटक केली.
वैशालीने लिहिलेल्या चिठ्ठीत तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने जीवन संपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आणि वैशालीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून बॉयफ्रेंड राहुल नवलानी, पत्नी दिशा आणि त्याच्या कुटुंबीयाविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. या घटनेनंतर शेजारी राहुल त्याच्या कुटुंबियांसोबत फरारी झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत इंदूर पोलिसांनी शेजारी राहुल याला बेड्या ठोकल्या. या घटनेची अजूनही काही माहिती मिळण्याची शक्यता असल्याने घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
वैशालीच्या खोलीतून एक चिठ्ठी आणि डायरी पोलिसांना हस्तगत केली आहे. या चिठ्ठीत वैशालीने तिचा शेजारी आणि राहुल नवलानीने शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. आई- बाबा मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. माझ्या मृत्यूला शेजारी राहुल नवलानी जबाबदार असून त्याला सोडू नका. राहुलने मला गेली अडीच वर्षे त्रास दिला आहे. राहुलसह त्याची पत्नी निशादेखील शिक्षा करा, अन्यथा माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आई क्विट'. असे वैशाली लिहिले आहे. तसेच तिने फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून राहूल ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपदेखील केला आहे.
हेही वाचलंत का?