पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने (Vaishali Takkar) आपले जीवन संपवल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी वैशालीच्या बहिणीने मोठा खुलासा केला आहे. मृत्यूनंतर मिळालेल्या एका चिठ्ठीतून तिचा शेजारी राहुल नवलानीचे नाव समोर आले आहे. यासंदर्भात अनेक अपडे्स समोर येत आहेत. आता वैशालीच्या चुलत बहिणीने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. (Vaishali Takkar)
वैशालीच्या चुलत बहिणीने अनेक खुलासे केले आहेत. वैशाली आपल्या बहिणीशी सर्व गोष्टी शेअर करायची. वैशालीच्या चुलत बहिणीने या गोष्टींचा उल्लेख केला की, राहुल वैशालीला कशा प्रकारे त्रास द्यायचा. वैशालीच्या बहिणीने सांगितलं की, राहुलने वैशालीला कानाखाली लगावली होती. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. या सर्व गोष्टींनी ती चिंतेत असून याप्रकारचे पाऊल उचलले होते.
राहुलने वैशाली ठक्करला म्हटलं होतं की, तो आपली पत्नी दिशाला घटस्फोट देऊन वैशालीशी लग्न करेल. वैशाली ठक्कर आणि राहुल यांच्या जवळचे नाते निर्माण झाले. पण, राहुलने पत्नी दिशाला घटस्फोट दिला नाही. त्यामुळे तिने राहुलला इग्नोर केले. त्यानंतर राहुलने वैशालीला धमकी देणं सुरु केलं. तो तिला त्रास द्यायचा. जेव्हा वैशालीच्या लग्नाची गोष्ट व्हायची, तो लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करायचा, असेही तिने म्हटले आहे.