पुणे : पुढारी वृत्तसेवा
मरपल्ली येथे तैनातीस असलेल्या पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या दोघा जवानांनी एकमेकांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात दोघांचाहीजागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
दोन्ही जवानांमध्ये किरकोळ कारणातून वैयक्तिक वाद झाला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना शिविगाळ केल्याने वातावरण आणखी चिघळले आणि त्याचे पर्यवसान एकमेकांवर रायफलने फायर करण्यात झाले, अशी प्राथमिक माहिती असून, हे दोघेहीजागीच ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे असून, दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील SRP कॅम्पचे जवान आहेत. घटनेचीमाहितीकळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.