Latest

T20 World Cup : सिडनीत टीम इंडियाला दिले केवळ सँडविच; संतप्त खेळाडूंची आयसीसीकडे तक्रार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ २०२२ च्या टी २० विश्वचषकातील पुढील सामना खेळण्यासाठी सिडनीला पोहोचला आहे. उद्या भारताचा नेदरलॅंडविरूद्ध सामना आहे. परंतु खेळाडूंना देण्यात आलेले जेवण आणि सरावासाठीचे मैदान यावरून ते नाराज असल्याचे समोर आले आहे. खेळाडूंना सरावानंतर दुपारच्या जेवणात थंड सँडविच आणि फळे देण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या खेळाडूंनी आयसीसीकडे तक्रार केली आहे. तसेच सरावाचे मैदान हॉटेलपासून ४२ किलोमीटर दूर असल्याने आज सराव सत्रही केले नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऐतिहासिक सिडनी क्रिकेट मैदानावर सराव करत होता. विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, दीपक हुडा, युझवेंद्र चहल आणि दिनेश कार्तिक यांनी सराव केला. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल यांनी विश्रांती घेतली.

सिडनीमधील वातावरण खूप थंड आहे. सरावानंतर खेळाडूंना योग्य जेवणाची गरज असताना त्यांना थंड सँडविच आणि फळे देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या टीम इंडियाने याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली आहे. दरम्यान, आज ब्लॅकटाऊनमध्ये सराव करायचा होता. हे स्टेडियम टीम इंडियाच्या हॉटेलपासून ४२ किलोमीटर अंतरावर असल्याने संघ सरावाला गेला नाही.

टीम इंडियाला जे जेवण देण्यात आले ते चांगले नव्हते. त्यांना केवळ सँडविच दिले गेले आणि त्यांनी आयसीसीकडे अशीही तक्रार केली आहे की सिडनीतील सराव सत्रानंतर दिलेले जेवण थंड होते आणि ते चांगले नव्हते, अशी माहिती BCCI च्या सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT