दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशी सजविण्याचा पारंपरिक बाज कोल्हापुरात आजही जपला जातो. सकाळी पंचगंगा नदीवर म्हशी आंघोळ घातली जाते. त्यानंतर सुशोभित केलेल्या म्हशी सागरमाळ येथे नेल्या जातात. सागरमाळ येथे सागरदेवाचे मंदिर आहे. म्हशींच्या अंगावर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात. गळ्यात व पायात घुंगराची माळ, शिंगांवर मोरपीसे, रिबीन याद्वारे म्हशींना सजविण्यात आले. सागर माळ येथे मोटरसायकलर म्हैस पळवणे, ३ हाकेत म्हैस पळवणे अशा विविध स्पर्धा भरवल्या जातात. गवळी गल्ली येथे मालकाला ओळखण्याची म्हशीची स्पर्धाही घेण्यात येतात.