पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबई मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी रणशिंग फुंकले आहे. कामाला लागा कोणता पक्ष सोबत येईल न येईल याचा विचार करू नका, असा आदेश दिला आहे.
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची बैठक पार पडली. मुसळधार पाऊस सुरू असूनही पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,छगन भुजबळ उपस्थित होते.
बीएमसी निवडणुकीसाठी सर्व सुत्रे शरद पवारांनी हाती घेतली आहेत. तसेच निवडणुकीसाठी आपण स्वतः लक्ष देणार असल्याचे आश्वासन पवार यांनी पदाधिका-यांना दिले आहे. शरद पवार स्वतः मुंबईत फिरून पक्षाला वेळ देणार आहे. शरद पवार यांनी मुंबई महापालिकेसाठी सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. दर 20 दिवसांनी प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून तिथल्या परिस्थितीचा अहवाल पवारांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा