मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क – चीननं घुसखोरी केली आहे, राज्यात कर्नाटकानेही घुसखोरी सुरु केली आहे. चीनच्या एजंटची उपमा देणाऱ्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. शिंदे-फडणवीस काहीच बोलत नसल्यामुळे बोम्मई यांची जीभ घसरत चाललीय, असे टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सोडले. ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले-'अमित शहांचा आदेश मानायला बोम्मई तयार नाहीत. बोम्मईंनी राजकीय फायद्यासाठी वाद सुरु केलाय. आमची कायद्याची भाषा आहे. बोम्मईंची फायद्याची भाषा आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या जनतेत कोणताही वाद नाही. महाराष्ट्र विधानसभेनं बोम्मईंविरोधात ठराव केला पाहिजे.
महाराष्ट्रात दुबळं सरकार बसलंय, असा हल्लाबोल राऊतांनी केला. सध्याच्या राज्य सरकारमध्ये हिम्मत आहे काय? शिंदे आणि फडणवीस आमच्यासोबत येणार का? असा राऊतांनी सवाल उपस्थित केला आहे. बोम्मईंनी अटक केली तरी आम्ही बेळगावात जाऊ. भाजप म्हणजे क्लीनचीटचा कारखाना अशीही टीका राऊत यांनी केली.