Latest

राजा राणीची गं जोडी : कोण असेल अपर्णाचा खूनी?

स्वालिया न. शिकलगार

कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. संजीवनीच्या मनात अनेक प्रश्न एकाच वेळी उभे राहिले आहेत. त्याचं कारणं आहे अपर्णाचा अचानक झालेला खून. काही दिवसांपूर्वी कुसुमावती अपर्णाला भेटायला गेल्या असल्याचे आपण राजा राणीची गं जोडी या मालिकेत बघितले.

राजा राणीची गं जोडी : सत्याच्या बाजूने उभी राहणार संजीवनी
राजा राणीची गं जोडी : सत्याच्या बाजूने उभी राहणार संजीवनी

त्याचवेळी सुजितदेखील अपर्णाला रागामध्ये भेटायला निघाला होता. आणि हे घडत असतानाच दादासाहेब आणि राजश्रीदेखील अपर्णाबद्दल बोलताना संजीवनीने बघितले. ज्यामध्ये दादासाहेब कुठे अपर्णाच्या जीवाचं बरं वाईट करू इच्छत नाही ना असं मनात येऊ गेलं.

आता मात्र अपर्णाचा खून झाला असून, तीन संशयित आहेत. हे तिन्ही संशयित ढालेपाटील घरातील आहेत. त्यामुळे संजीवनीसमोर खूप मोठा पेच उभा राहिला आहे. सुजित असो कुसुमावती असो वा दादासाहेब असो निर्णय तिला घ्यावाचं लागणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजीवनी ठामपणे तिचं मत रणजीत पुढे मांडताना दिसते आहे. अर्जुनाला देखील त्याच्या घरच्यांविरुध्द उभं राहावं लागलंच होतं. मी घरच्यांच्या नाही सत्याच्या बाजूने उभं रहाणार. असे म्हणताना ती दिसली.

या खुनाच्या शोधात संजीवनीला रणजीतची साथ प्रत्येक वळणावर मिळणार हे निश्चित! संजू कशी खर्‍या गुन्हेगारापर्यंत पोहचणार? कुठल्या अडचणी तिच्यासमोर येणार? कशी ती रणजीतच्या साथीने हे संकट पार करणार? या प्रश्नांची उत्तरं लवकरच आपल्याला मिळतील.

हेदेखील वाचलंत का?

SCROLL FOR NEXT