Latest

नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव

अंजली राऊत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन-तीन दिवसांपासून देवळा शहर व तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा बुधवारी (दि. 8) दुपारी पुन्हा तडाखा बसल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. वाखारी गावातील चिंचबारी शिवारात गारपीट झाल्याने तेथे अतोनात नुकसान झाले.

काढणीला आलेल्या द्राक्षबागा व शेतात उभा असलेला व काढणीला आलेला गहू, हरभरा, ऐन उमेदीत असलेला रब्बी कांदा तसेच शेतात काढून ठेवलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी खर्डे परिसरातील वर्षी, कांचने आदी भागात तुरळक प्रमाणात गारपीट झाली. कांदा, गहू व इतर या पिकांचे यामुळे नुकसान झाले. शेतमालाला भाव मिळत नसताना गारपिटीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात निसर्गाची अवकृपा, शासनाची धरसोड वृत्ती या दुहेरी-तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला कोणी वाली नाही. कांदा व इतर शेतमालाला भाव नसल्याने तालुक्यातील माळवाडी येथील शेतकर्‍यांनी गाव विकण्याचा एकमुखी ठराव केल्याने हा विषय संपूर्ण राज्यात गाजला गेला. याचे थेट पडसाद सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील चर्चिला गेला असून, शासनाने याची तत्काळ दखल घेऊन भरपाई देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह इतर हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. – कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT