नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला भाजपपासून धोका असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक तसेच दिल्ली महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने भाजपवाल्यांनी केजरीवाल यांना मारण्याचा कट रचला आहे. या कटात भाजपचे खासदार मनोज तिवारी सामील असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले. केजरीवाल यांच्यावर हल्ला करा, अशी उघड चिथावणी मनोज तिवारी देत आहेत. यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते. मात्र, त्यांच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असेही सिसोदिया यांनी नमूद केले. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष तिकिटे विकत असून पक्षात जी बेबंदशाही माजली आहे, त्यामुळे केजरीवाल यांची आपणास चिंता वाटते, असे मनोज तिवारी यांनी नुकतेच सांगितले होते.
हेही वाचलंत का ?