पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील मंड्या येथे भीषण अपघात झाला. कार कालव्यात कोसळून पाच जण ठार झाले. पांडवपूर तालुक्यातील बन्नघट्टाजवळ मंगळवारी (दि.८) सायंकाळी हा अपघात झाला. चंद्रप्पा ( वय ६१), कृष्णप्पा (वय ६०), धनंजय (वय ५५), बाबू आणि जयन्ना, अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कार म्हैसूरहून भद्रावतीकडे परतत असताना ही घटना घडली.
अपघातात मृत्यू झालेले गुंगारहल्ली, नॉनविनाकेरे, तिप्तुरू येथील रहिवासी असून ते भद्रावती येथे राहत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथील रहिवासी असलेले चंद्रप्पा हे म्हैसूरहून भद्रावतीकडे कारने परतत होते. वाटेत एका वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार बॅरिकेडला धडकून कालव्यात कोसळली. कालव्यात पाणी जास्त असल्याने गाडीतील लोक बुडाले. कालपासून केआरएस जलाशयातून कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडी कालव्यातून बाहेर काढली.
हेही वाचा :