पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. रविवारी (दि.९) रात्री ही चकमक झाली आणि अजूनही सुरू आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ९) जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या तंगपावा गावात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरु झाली. या चकमकीत सोमवारी (दि.१०) दोन दहशतवादी ठार झाले. अजूनही चकमक सुरु आहे. या भागात आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.