पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 11, Delhi Yamuna River : उत्तर भारतात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर आला असून त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत नदीजवळ राहणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या लोकांसाठी खाण्या-पिण्याची योग्य ती सोय करण्यात आली, असल्याची माहिती केजरीवाल सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दिल्लीला देखील तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. पावसामुळे यमुना नदीने पूर पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी आणखी वाढले तर प्राणहानी होऊ शकते, हे लक्षात घेऊन दिल्ली प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या हजारो लोकांना पूर्व, ईशान्य, उत्तर, मध्य, दक्षिण पूर्व दिल्लीसह शाहदरा या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलविले आहे. दरम्यान तीन दिवसांच्या पावसानंतर मंगळवारी दिल्लीत पावसाने उसंत घेतली होती.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.