Latest

भंडारा : गोसे धरणाच्या उजव्या कालव्यातून २ तरुण वाहून गेले

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी पवनी तालुक्यातील अत्री येथे ३ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पवनी येथील गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात आंघोळीसाठी गेलेले २ तरुण वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. ही घटना बुधवारी (दि.३१) दुपारी घडली.

अमु खान (वय २२) व निम्मु खान (वय ३६, रा. नागपूर) हे गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने या तरुणांचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT