

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान त्यांना निवडणूक प्रचारासाठी कोणतेही बंधन नाही. या संदर्भातील माहिती केजरीवालांचे वकील शादान फरासत यांनी माध्यमांना दिली.
केजरीवाल यांचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील शादान फरासत म्हणतात, त्यांच्या निवडणूक प्रचारावर कोणतेही बंधन नाही. आम्ही त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू.", असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज (दि.१०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान त्यांना (Arvind Kejriwal) १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे.
यापूर्वीच्या 7 मेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सक्षम करण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज (दि.१०) त्यांना लोकसभा प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीत पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदान २५ मे रोजी पार पडत आहे. दरम्यान केजरीवाल यांना आम आदमी पक्षातील उमेदवारांचा प्रचार करता यणार आहे. हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपला मोठा दिलासा मानला जात आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या तिहार तुरुंगात होते.
ईडी आपल्या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार म्हणून केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख करणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाचा दावा आहे की, अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित मनी ट्रेल शोधून काढले आहे. उद्या (दि..१० मे) सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरही सुनावणी होणार आहे.