T20 World Cup 2026 : टीम इंडिया अडचणीत; टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघासाठी उद्भवला मोठा धोका

T20 World Cup threat : वेळीच या उणिवांवर काम केले नाही, तर जागतिक स्पर्धेत टीम इंडियाला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
T20 World Cup 2026 India squad problems
Published on
Updated on

T20 World Cup 2026 India squad problems

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघाची एक मोठी कमकुवत बाजू उघड झाली आहे. जर वेळीच या उणिवांवर काम केले नाही, तर जागतिक स्पर्धेत टीम इंडियाला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

एखाद्या सामन्यात अपयश येऊ शकते, मात्र सलग चार सामन्यांत एकाच प्रकारच्या चुकीची पुनरावृत्ती होत असेल, तर ती गंभीर चिंतेची बाब आहे. भारतीय संघाच्या सलामी जोडीतील सातत्यपूर्ण अपयशामुळे आता संघ व्यवस्थापनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

T20 World Cup 2026 India squad problems
ICC Rankings : आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचा डंका! अभिषेक 'नंबर 1'वर भक्कम, तर सूर्याची टॉप १० मध्ये वादळी झेप

सलामीची जोडी ठरतेय 'फ्लॉप'

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका भारतीय संघाने जिंकली असली, तरी सलामीच्या जोडीने चाहत्यांची आणि निवडकर्त्यांची घोर निराशा केली आहे. चारही सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीरांना भक्कम पाया रचून देण्यात अपयश आले.

  • पहिला सामना : केवळ १८ धावांवर पहिला गडी बाद झाला. संजू सॅमसन अवघ्या १० धावा करून माघारी परतला.

  • दुसरा सामना : संघाची धावसंख्या ६ असतानाच पहिला धक्का बसला. सॅमसन अवघ्या ६ धावांवर बाद झाला.

  • तिसरा सामना : पहिल्याच चेंडूवर भारताने विकेट गमावली. संजू सॅमसनला खातेही उघडता आले नाही.

  • चौथा सामना : यावेळीही शून्यावरच भारताची पहिली विकेट पडली. सलामीवीर अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला.

T20 World Cup 2026 India squad problems
T20 World Cup : बांगला देशच्या हकालपट्टीनंतर वर्ल्डकपसाठी स्कॉटलंडचा संघ जाहीर; अफगाण वेगवान गोलंदाजासह माजी किवी खेळाडूला संधी

विजयी घोडदौडीत झाकली गेली कमकुवत बाजू

मालिका विजयामुळे पहिल्या तीन सामन्यांतील खराब सुरुवातीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, चौथ्या सामन्यातील पराभवानंतर संघाचे हे कच्चे दुवे स्पष्टपणे समोर आले आहेत. मधल्या फळीने डाव सावरल्यामुळे विजय मिळत असले, तरी सलामीच्या जोडीचे अपयश आगामी विश्वचषकात भारताला महागात पडू शकते.

जर टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवायचे असेल, तर भारतीय संघ व्यवस्थापनाला सलामीच्या जोडीबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावे लागतील. अन्यथा, मोठ्या स्पर्धेत पराभवासाठी सज्ज राहावे लागेल, असा इशारा क्रिकेट तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news