IPL franchises : "हा तुमचा आणि खेळाडूंचा..."; IPL मधून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंबाबत BCCI फ्रँचायझींना नेमकं काय म्‍हणाले?

वादग्रस्त मुद्दा खेळाडू आणि फ्रँचायझी यांनी आपापसात सोडवला पाहिजे
IPL franchises : "हा तुमचा आणि खेळाडूंचा..."; IPL मधून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंबाबत BCCI फ्रँचायझींना नेमकं काय म्‍हणाले?
Published on
Updated on

BCCI Message To IPL franchises : नुकत्याच संपलेल्या आयपीएल हंगामात फ्रँचायझींनी चिंता व्यक्त करूनही, बीसीसीआय (BCCI) विदेशी खेळाडू आणि त्यांच्या संघांमध्ये मध्यस्थी करण्याची कोणतीही योजना आखत नाहीये. लिलावात खरेदी केल्यानंतर स्पर्धेतून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंवर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घालण्याचा नियम आधीच लागू केला आहे, तरीही दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमध्ये खेळाडूंच्या उपलब्धतेचा प्रश्न कायम आहे. जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांसारखे खेळाडू दुखापतींमुळे स्पर्धेच्या पूर्वार्धात उपलब्ध नव्हते. स्टार्कच्या अनुपस्थितीचा दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसला होता.

IPL मधून माघार घेतला सॅम करन मायदेशात खेळला!

प्ले-ऑफच्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. सॅम करनने दुखापतीचे कारण देत आयपीएलमधून माघार घेतली होती; पण तो मायदेशी (UK) मध्ये टी-२० सामना खेळताना दिसला. पंजाब किंग्सचे सह-मालक मोहित बर्मन यांनीही म्हटले आहे की, विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत बीसीसीआय आणि इतर क्रिकेट बोर्डांनी अधिक चांगला समन्वय साधण्याची गरज आहे.मात्र, बीसीसीआयचे मत आहे की हा वादग्रस्त मुद्दा खेळाडू आणि त्यांची फ्रँचायझी यांनी आपापसात सोडवला पाहिजे.

IPL franchises : "हा तुमचा आणि खेळाडूंचा..."; IPL मधून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंबाबत BCCI फ्रँचायझींना नेमकं काय म्‍हणाले?
FIFA World Cup 2026 Controversies : सध्या फुटबॉल सोडून 'इतर' सर्वच विषयांची चर्चा! फुटबॉलपटू ताब्यात, तर रेफरीची हकालपट्टी!

फ्रँचायझी हेच खेळाडूंचे पालक

"फ्रँचायझी हेच खेळाडूंचे पालक आहेत. आम्ही हा निर्णय त्यांच्यावर आणि खेळाडूंसोबतच्या त्यांच्या परस्पर समन्वयावर सोडतो. काही खेळाडू देशाच्या कर्तव्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात, तर काही याच्या उलट करतात. दुखापत असल्याशिवाय आमचे नियम अगदी स्पष्ट आहेत (दोन वर्षांची बंदी)," अशी माहिती बीसीसीआयच्या एका सूत्राने जोफ्रा आर्चरच्या प्रकरणाचा हवाला देत 'पीटीआय'ला दिली.

IPL franchises : "हा तुमचा आणि खेळाडूंचा..."; IPL मधून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंबाबत BCCI फ्रँचायझींना नेमकं काय म्‍हणाले?
कपिल देव यांची सही, भारतीय संघाने खरेदी केली दारू आणि सिगारेट? १९८३च्या पार्टीचे बिल व्हायरल; माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

सॅम करनच काय करायचे हे फ्रँचायझीने ठरवावे

आर्चर हा रॉयल्सकडून खेळतो आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) त्याच्या वर्कलोडवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा व्यक्त करूनही त्याने संपूर्ण स्पर्धेसाठी स्वतःला उपलब्ध करून दिले होते. "सॅम करनच्या बाबतीत सांगायचे तर, पुढील हंगामात काय करायचे हे फ्रँचायझीला ठाऊक असेल," असे सूत्राने सांगितले.

IPL franchises : "हा तुमचा आणि खेळाडूंचा..."; IPL मधून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंबाबत BCCI फ्रँचायझींना नेमकं काय म्‍हणाले?
Mohammad Amir IPL: मोहम्मद आमिर IPL खेळणार... पाकिस्तान सोडले, मिळाला UK चा पासपोर्ट; केकेआर, हैदराबाद लावणार बोली?

लिलावाच्या रकमेत मोठ्या वाढीची गरज नाही

सध्या लिलावाची एकूण रक्कम १२५ कोटी रुपये आहे, परंतु खेळाडूंचे करार अजूनही युरोपियन फुटबॉल किंवा एनएफएल (NFL) च्या तोडीस तोड नाहीत. बीसीसीआय लिलावाच्या रकमेत अचानक मोठी वाढ करण्याऐवजी ती हळूहळू वाढवण्यावर भर देते."आम्ही निश्चितपणे वाढीचा विचार करू शकतो, परंतु आम्हाला सर्व बाजूंचा विचार करावा लागेल. अनेक खेळाडूंना एका हंगामासाठी प्रचंड रक्कम मिळते आणि पुढच्या हंगामात ते कुठेच दिसत नाहीत. तसेच, अनेक फ्रँचायझी खेळाडूंना त्यांच्या कराराव्यतिरिक्तही पैसे देतात. खेळाडूंना मॅच फी देखील मिळते (प्रति सामना ७.५ लाख रुपये) आणि स्पर्धेदरम्यान अतिरिक्त प्रायोजकत्व (Sponsorship) देखील मिळते," असे सूत्राने स्पष्ट केले.

IPL franchises : "हा तुमचा आणि खेळाडूंचा..."; IPL मधून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंबाबत BCCI फ्रँचायझींना नेमकं काय म्‍हणाले?
IPL 2026 Controversy | "ओये अंधेरे..." अर्शदीप सिंगची तिलक वर्मावर वर्णद्वेषी टीका? व्हायरल व्हिडिओमुळे नवा वाद!

सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ करण्याचा विचार

बीसीसीआय २०२८ च्या हंगामापासून सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ करण्याचा विचार करत आहे आणि त्यासाठी मोठ्या कालावधीची) आवश्यकता असेल. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, यासाठी मार्चचा पहिला आठवडा ते मे महिन्याचा मध्य हा सर्वोत्तम कालावधी आहे. २०२६ चा हंगाम मार्चच्या शेवटी सुरू झाला होता आणि अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला गेला होता. "सध्याच्या कालावधीत आपण ९४ सामने खेळवू शकत नाही, कारण मे नंतर मान्सून सुरू होतो. एकतर आपल्याला याचे दोन भाग करावे लागतील किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून १५ मे पर्यंत स्पर्धा घ्यावी लागेल. ९४ सामने खेळवण्यासाठी हाच सर्वोत्तम कालावधी असेल."

IPL franchises : "हा तुमचा आणि खेळाडूंचा..."; IPL मधून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंबाबत BCCI फ्रँचायझींना नेमकं काय म्‍हणाले?
BCCI RTI exemption |'बीसीसीआय' RTI कायद्याच्या कक्षेबाहेर ; केंद्रीय माहिती आयोगाने स्वतःचाच निर्णय बदलला!

द्विपक्षीय मालिकांच्या व्यवहार्यतेचाही विचार करावा लागेल

"आम्हाला भविष्यातील द्विपक्षीय मालिकांच्या (Bilateral Series) व्यवहार्यतेचाही विचार करावा लागेल. प्रत्येक देशाची स्वतःची लीग आहे, ते आता भारत दौऱ्यावर पूर्णपणे अवलंबून नाहीत. त्यामुळे भविष्यात द्विपक्षीय मालिका किती फायदेशीर ठरतील, हे पाहावे लागेल. ब्रॉडकास्टर्सना (प्रसारणकर्ते) देखील आता काही द्विपक्षीय मालिकांमध्ये फारसा रस उरलेला नाही. जर क्रिकेटला फुटबॉलच्या मार्गाने जायचे असेल, तर सर्व बोर्डांनी याला मान्यता देणे गरजेचे आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news