ICC T20 WC : कॅनडा-भारत सामन्यात पावसाची फलंदाजी; टॉसला विलंब
![ICC T20 WC](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2024/06/15200617/Untitled-design-1-181.jpg)
पुढारी ऑनलाईन डेस्क| ICC T20 WC : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 33 वा सामना कॅनडा-भारत यांच्यात होत आहे. सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे मैदान ओले असल्याने पंच रात्री ८ वाजता मैदानाची पाहणी करतील त्यानंतर सामना सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.