टीम इंडियासाठी गूड न्यूज, आर अश्विन राजकोटला परतला
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया फिरकीपटू आर. अश्विन आज (दि.१८) पुन्हा एकदा संघात सहभागी होण्यासाठी राजकोटमध्ये परतला आहे. आई आजारी असल्यामुळे राजकोट कसोटीच्या तिसर्या दिवशी तो घरी गेला होता. यानंतर टीम इंडिया १० खेळाडूंसह मैदानात उतरली हाेती. ( R Ashwin returns to Rajkot, to rejoin team on Day Four )
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज स्पष्ट केले की, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीत अश्विनला तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर संघातून तात्पुरते माघार घ्यावी लागली होती. अल्पकाळाच्या अनुपस्थितीनंतर अश्विनचे संघात पुनरागमन केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. तो चौथ्या दिवशी पुनरागमन करेल आणि कसोटी सामन्यात संघासाठी योगदान देत राहील.
राजकोट कसोटीतील दोन दिवसांच्या खेळानंतर आई आजारी असल्याने अश्विनला घरी जावे लागले होते. आम्ही कुटुंबाचे महत्त्व प्राधान्याने मान्य केले आहे. या आव्हानात्मक काळात अश्विनच्या समर्थनार्थ संघ आणि त्याचे समर्थक एकजुटीने उभे राहिले आहेत आणि व्यवस्थापनाला त्याचे मैदानात परत स्वागत करताना आनंद होत आहे, असेही ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे. ( R Ashwin returns to Rajkot, to rejoin team on Day Four )
🚨 UPDATE 🚨: R Ashwin set to rejoin #TeamIndia from Day 4 of the 3rd India-England Test.#INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/rU4Bskzqig
— BCCI (@BCCI) February 18, 2024
आर अश्विनची 500 कसोटी बळींच्या क्लबमध्ये एन्ट्री
भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने इतिहास रचला. त्याने जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचा हा आकडा गाठणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
रविचंद्रन अश्विनने 98 कसोटी सामन्यांच्या 184 डावात कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळेने 105 सामन्यांमध्ये 500 कसोटी बळी पूर्ण केले होते. त्याचबरोबर कसोटीत सर्वात जलद 500 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने 87 कसोटी सामन्यात 500 विकेट घेतल्या आहेत. चेंडूंच्या बाबतीतही अश्विनने जेम्स अँडरसनचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेण्यासाठी एकूण 25,714 चेंडू टाकले तर जेम्स अँडरसनने यासाठी 28,150 चेंडू टाकले. आता जर आपण कमीत कमी चेंडूंमध्ये 500 कसोटी विकेट्स घेण्याबद्दल बोललो तर या यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर जेम्स अँडरसन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 500 बळी घेण्याचा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे ज्याने 25,528 चेंडूत इतक्या विकेट्स घेतल्या. (R Ashwin 500 Test Wicket)
भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. तर अनिल कुंबळे या यादीत आघाडीवर आहे. अनिल कुंबळेने भारताकडून कसोटीत एकूण 619 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विनही दुस-या स्थानावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 728 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा :
- IND vs ENG 3rd Test : शुभमन गिलला शतकाची हुलकावणी; ९१वर धावबाद
- Ravindra Jadeja’s Century : रोहित पाठोपाठ जडेजाची बॅट ‘तळपली’, राजकाेट कसाेटीत शतक