Asia Cup 2023 : स्पर्धा पाकिस्तानात; भारताचे सामने तटस्थ देशात; आशिया चषकाचा तोडगा द़ृष्टिक्षेपात

Asia Cup 2023 : स्पर्धा पाकिस्तानात; भारताचे सामने तटस्थ देशात; आशिया चषकाचा तोडगा द़ृष्टिक्षेपात
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशिया चषक जर पाकिस्तानात झाला तर भारत खेळणार नाही, असे बीसीसीआयने पूर्वीच म्हटले होते, पण आता आशिया चषक 2023 ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असली तरी भारत पाकिस्तानात न जाता आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळणार असल्याने त्यामुळे आशिया चषकाचा तोडगा द़ृष्टिक्षेपात आला आहे.(Asia Cup 2023)

पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा होणार असेल तर भारत तिथे जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर जर भारत पाकिस्तामध्ये खेळण्यास येणार नसेल तर आम्हीदेखील त्यांच्या देशात वन-डे विश्वचषक खेळायला जाणार नाही, असा धमकी वजा इशारा पाकिस्तानने दिला होता. त्यानंतरही बीसीसीआय आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे आशिया चषकाचे ठिकाण बदलण्यावर जोरदार चर्चा सुरू होती. पाकिस्तान सोडून अन्य ठिकाणी आशिया चषकाचे सामने झाले तर भारताने खेळण्यास होकार दिला होता. त्यामुळे आशिया चषक आता दुबई किंवा श्रीलंकेत खेळवला जाऊ शकतो, असे म्हटले जात होते; पण या स्पर्धेचे यजमानपद सोडण्यास मात्र पाकिस्तानचा नकार तर होताच, पण ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर जाऊ देणार नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे आता त्यांचे म्हणणे खरे झाले आहे. (Asia Cup 2023)

क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषक स्पर्धा आता पाकिस्तानात होणार असून त्याचे यजमानपदही त्यांच्याकडे असेल. त्याचबरोबर भारत हा या स्पर्धेत खेळणार आहे. पण भारत हा पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचेही समोर येत आहे. भारत जर पाकिस्तानात गेला नाही तर स्पर्धा कशी होणार, हा प्रश्न सर्वांना पडला होता, पण याचे उत्तर आता समोर आले आहे. स्पर्धा पाकिस्तानात होत असली तरी भारताचे सामने हे अन्य ठिकाणी होतील. त्यामुळे आशिया चषकाचे बहुतांशी सामने पाकिस्तानात होणार असले तरी भारत मात्र तिथे न जाता या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता अशा पद्धतीने होणार आहे.

तटस्थ ठिकाणच्या हवामानाचा विचार केला जाणार

आशिया कप 2023 चे पाकिस्तानमध्येच खेळवले जाऊ शकतात. तर भारतीय संघ आपले सामने दुसर्‍या देशात खेळणार आहे. आशिया कप आयोजित करण्यासाठी पीसीबीने हा पर्याय शोधला आहे. भारतीय संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळू शकेल.

आशिया चषक यावर्षी सप्टेंबरमध्ये पार पडणार आहे. अशा परिस्थितीत, युएईमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला तापमान साधारणपणे 40 अंशांच्या आसपास राहते. मात्र, अशा स्थितीतही तिथे क्रिकेट खेळले जाते.

यावेळीही आशिया चषक स्पर्धेत केवळ 6 संघ सहभागी होणार आहेत. हे संघ भारत, पाकिस्तान, गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगला देश आणि एक एक क्वालिफायर टीम असेल. हे सर्व संघ दोन गटांत विभागले जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत 6 संघांमध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहेत.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news