T20 World Cup Final : फायनल पावसामुळे वाहून गेल्यास काय होईल? कोणता संघ विजेता ठरेल? | पुढारी

T20 World Cup Final : फायनल पावसामुळे वाहून गेल्यास काय होईल? कोणता संघ विजेता ठरेल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup Final England and Pakistan : टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना (T20 World Cup Final) 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात हा अंतिम सामना रंगणार आहे. पाकिस्तानला 2008 तर इंग्लंडला 2010 मध्ये टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला, तर इंग्लंडने भारताचा पराभव करत फायनलचे तिकीट मिळवले. आता पाकिस्तान आणि इंग्लंडला विश्वचषक जिंकून टी 20 चे चॅम्पियन बनायचे आहे.

पावसामुळे फायनल रद्द झाली तर? (T20 World Cup Final)

टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला आणि राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल. आयसीसीने असाही नियम बनवला आहे की, पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ-लुईस नियम तेव्हाच लागू होईल जेव्हा दोन्ही संघांनी त्यांच्या डावातील किमान 10-10 षटके खेळली असतील.

2009 मध्ये पाकिस्तानने विजेता (T20 World Cup Final)

2009 च्या टी 20 विश्वचषकात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. 2009 च्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला होता.

2010 मध्ये इंग्लंड चॅम्पियन

2010 मध्ये इंग्लंडने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता इंग्लंडला टी-20 विश्वचषकात पुन्हा विजयाची चव चाखायला आवडेल. 2019 मध्ये इंग्लंड वनडेचा विश्वविजेता बनला होता.

Back to top button