पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही संघ आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गाेलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे याच मैदानावर दोन्ही संघाचा शेवटचा सामना रंगला होता. गेल्या वर्षी झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत २४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान गट स्टेजच्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव झाला. विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ होती. जवळपास ३०७ दिवसांनंतर हे दोन्ही संघ पुन्हा एकदा याच मैदानावर आमनेसामने आले आहेत. त्यामुळे भारतासाठी हा सामना पूर्वीचा हिशोब चुकता करण्याचा असेल, तर पाकिस्तानसाठी त्यांच्या मागील ऐतिहासिक विजयामुळे त्यांचे मनोबल वाढवणारा असेल.
भारत पाकिस्तान सामना नेहमीच रोमांचक असतो पण यावेळी तो आणखी खास असेल कारण गेल्या वेळी म्हणजे टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवामुळे चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेतील त्या पराभवाचा बदला घ्यायचाच आहे. आशिया चषकाच्या इतिहासात दोन्ही देशांमधील जवळपास सर्वच सामने संस्मरणीय ठरले आहेत, परंतु काही सामने असे आहेत जे आजही दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. (INDvsPAK Asia Cup)
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, यजुवेंद्र चहल
पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, असिफ अली, शाहबाद खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रॉफ, शाहनवाज दहानी
हेही वाचा