भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरा टी-20 सामना
सेंट किट्स; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिज दौर्यावर असलेला भारतीय संघ आज वेस्ट इंडिजविरुध्द दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने आरामात विजय मिळवला होता. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 ने आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
पहिल्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावून आपण फार्मात असल्याचा इशारा प्रतिस्पर्धी संघाला दिला आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या वनडे मालिकेत भारताने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजला 3-0 असा व्हाईटवॉश दिला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल.