समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या टप्प्याचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्यानंतर हा मार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, या मार्गावर वेगमर्यादांचे कुठलेही बंधन पाळले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील १८ दिवसातच या मार्गावरील विविध भागात किमान ४० अपघात झाल्याची व त्यात ७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीची अधिकृत आकडेवारी एमएसआरडीसीकडून अद्यापही देण्यात आलेली नाही.