आदित्य रॉय Aashiqui 3 मधून बाहेर, कार्तिक आर्यनला भूमिका मिळताच...
पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट ‘आशिकी’च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी पसंतीस उतरले होते. चित्रपटाच्या पहिल्या भागात राहुल रॉयने आपल्या अभिनयाने सर्वांना भूरळ घातली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) ने आपल्या अदाकारीने फॅन्सचे लक्ष केंद्रीत केले होते. आता या फ्रेंचायजीचा तिसरा भाग म्हणजे ‘आशिकी ३’ ची घोषणा मागील वर्षी २०२२ मध्ये करण्यात आलं होतं. ‘आशिकी ३’ (Aashiqui 3) मध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मुख्य भूमिका देण्यात आली आहे. यानंतर आदित्य रॉय कपूरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Aashiqui 3)
संबंधित बातम्या –
- Rubina Dilaik : बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा; अभिनव शुक्लाचं केक कापून सेलिब्रेशन
- Koose Munisamy Veerappan series : मगरी तुमचं शोषण करायच्या प्रतीक्षेत; वीरप्पनने रजनीकांतना दिला होता इशारा
- Atal Serial : अलिना – अलिन जैस्वाल जुळ्या बहिणींचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
आदित्य रॉय कपूर चित्रपट निर्माते करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण ८’ (Koffee With Karan ८) मध्ये पोहोचला होता. शो दरम्यान करण जोहरच्या या प्रश्नावर आदित्य रॉय कपूरने रिॲक्शन दिलीय.
कार्तिक आर्यनविषयी आदित्य रॉय कपूर काय म्हणाला?
‘कॉफी विथ करण ८’ चा होस्ट करण जोहरने आदित्य रॉय कपूरला प्रश्न उपस्थित केला होता की, ‘जेव्हा कोणी तुमची फ्रेंचायजी पुढे घेऊन जातो, तेव्हा कसं वाटत.’ यावर आदित्य रॉय कपूरने म्हटले, ‘कार्तिक आर्यन चित्रपट आशिकी ३ मध्ये अभिनय करण्यासाठी परफेक्ट आहे. या चित्रपटात मी असण्याची कोणतीच शक्यता नव्हती. कारण दुसऱ्या भागात माझ्या भूमिकेने मोठी उडी घेतली होती. मला वाटतं की, हे खूपचं छान आहे. मी मेलोय, आता मी कुठे परत येणार? माझी आत्मा परत येईल.’ करण जोहरने मजेत म्हटलं की, ‘आत्मा कार्तिक आर्यनला त्रास देईल.’ यावर आदित्य रॉय कपूरने मिश्किलपणे सांगितलं की, ‘होय, कार्तिक आर्यनच्या मागे आत्मा फिरेल, तो खलनायक आहे.’