The Kerala Story चित्रपट वास्तव कथेवर आहे तर सरकारला तपास करायला हवा : आरिफ मोहम्मद खान

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट द केरळ स्टोरीवर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. (The Kerala Story) चित्रपट ३२ हजार मुलींना इसिसमध्ये भरती करण्यावर आधारित आहे. दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’वर सुरु असलेल्या वादादरम्यान केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे वक्तव्यदेखील समोर आले आहे. या चित्रपटाबाबत विधान करत ते म्हणाले की, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की, ते राज्यातील कोणत्याही प्रकारच्या लव्ह जिहादच्या घटनांविरोधात पाऊले उचलावीत. (The Kerala Story)
आरिफ मोहम्मद खान म्हणाले, मी चित्रपट पाहिलेला नाही. मी काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही. जर ते म्हणत असतील की, हा चित्रपट वास्तव कहामींवर आधारीत आहे तर मग मला वाटतं की, या प्रकरणाचा तपास करणे सरकारचे कर्तव्य आहे.
ट्रेलर रिलीज झाल्यानंतर उद्भवला वाद
अदा शर्मा स्टारर सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट ‘द केरल स्टोरी’ चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाची कहाणी केरळच्या ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची आहे. ज्यांना तथाकथितपणे लव्ह जिहादमध्ये अडकवण्यात आले आहे.
- The Kerala Story च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास केरळ हायकोर्टाकडून नकार, ‘तो’ टीझरही हटवणार
- The Kerala Story मुस्लिमांविरोधात नव्हे तर दहशतवादाविरोधात : दिग्दर्शक, निर्मात्यांनी केले चित्रपटाचे समर्थन
- The Kerala Story वरुन पीएम मोदींचा काॅंग्रेसवर निशाणा, काँग्रेसनं व्होट बँकेसाठी दहशतवादाला पाठबळ दिलं
#WATCH | Kochi, Kerala: I have not seen the film. I am not in a position to say anything. But if they are saying this film is based on actual stories, then I think it is duty of the government to investigate the matter: Kerala Governor Arif Muhammad Khan on ‘The Kerala Story’ pic.twitter.com/peYTw9SW2i
— ANI (@ANI) May 5, 2023