Salman Khan And Rahul Gandhi : सलमान खानने केले राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’चे समर्थन ? | पुढारी

Salman Khan And Rahul Gandhi : सलमान खानने केले राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’चे समर्थन ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सलमान खान (Salman Khan) याचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने हिंदू -मुस्लीम एकतेवरुन एक गाणे गायिले आहे. या गाण्यावरुन त्याने हा व्हिडिओ राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरु केलेल्या ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) या अभियानाला सर्मपित केले आहे असे म्हटले जात आहे. यावरुन सलमान खानने राहूल गांधीचे समर्थन केले आहे अशी एक जोरदार चर्चा सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. जाणून घ्या नेमकं या मागे काय शिजत आहे. (Salman Khan And Rahul Gandhi)

राहूल गांधी यांची ‘भारत जोडो’ अभियान यात्रा केरळमध्ये सुरु आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या माहितीनुसार या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर सत्तेत असणाऱ्या भाजपने (BJP) या आंदोलनावर वेळोवेळी टीका केली आहे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी याची खिल्ली देखील उडवली आहे. दुसरीकडे काँग्रेस (congress) पक्षाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. ‘भारत जोडो’ अभियाना पेक्षा काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमुळे काँग्रेस अधीक चर्चेत आली आहे. हे सर्व सुरुच असताना सलमान खान याचे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे आणि या गाण्याद्वारे तो राहूल गांधी आणि भारत जोडो अभियानाचे समर्थन करतो आहे असे म्हटले जात आहे. (Salman Khan And Rahul Gandhi)

नेमके घडले असे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांनी २५ सप्टेंबर रोजी आपल्या ट्वीटर हँडलवर सलमानचे गाणे पोस्ट करत ट्वीट केले. ते गाणे ‘हिंदू मुस्लीम भाई भाई’ असे आहे. या गाण्याचे ट्वीट करत दिग्वीजय सिंह यांनी कॅप्शन लिहले की, हिंदू मुस्लीम शिख ईसाई सब अपने भाई भाई, हम सब एक है # भारत_जोडो_यात्रा #BharatJodoYatra. या व्हिडिओला शेअर करत त्यांनी राहूल गांधी यांना सुद्धा टॅग केले. दिग्वीजय सिंह यांच्या शिवाय संजय निरुपम यांच्यासहित अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. (Salman Khan And Rahul Gandhi)

तेव्हा पासून हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यासोबत सलमान खान याने राहूल गांधी आणि भारत जोडो अभियानाचे समर्थन केले असलेल्या चर्चांना उत आला. पण नेमकं या मागचे सत्य काय याची पडताळणी कोणीही केलेली नाही. तर त्याचे झाले असे की, लॉकडाऊनच्या काळात सलमान खान याने त्यांच्या अधिकृत युट्यूब अकाऊंटवर त्याने स्वत: गायिलेले गाणे पोस्ट केले. तेव्हा पासून या गाण्याला सलमान खानच्या चाहत्यांसहित सर्वांनी पसंती दिली आहे. ईदच्या निमित्ताने हे गाणे त्याने पोस्ट केले होते. ईदच्या निमित्ताने सलमान खान हा आपल्या चाहत्यांसाठी नेहमी नवा चित्रपट घेऊन येत असतो. पण, तेव्हा लॉकडाऊनच्या काळात त्यांचा कोणताही चित्रपट आला नव्हता. म्हणून त्याने स्वत: गायिलेले गाणे चाहत्यांसाठी पोस्ट केले. या गाण्याला तब्बल ८५ मिलियनहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे व हे गाणे पाहिले आहे. तसेच सध्या हे गाणे पोस्ट करुन तब्बल दोन वर्षे उलटली आहेत. (Salman Khan And Rahul Gandhi)

भारत जोडो च्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी सलमान खानचे हे गाणे पुन्हा एकदा शेअर केले. या अभियानाच्या निमित्ताने हे गाणे पुन्हा एकदा व्हायरल झाले. याचा फायदा तसा राहूल गांधी, भारत जोडो अभियान आणि सलमान खानला सुद्धा झाला आहे. पण, ज्यांना या तिघांचा देखील राग येतो, जे या तिघांचा सुद्धा तिरस्कार करतात. अशा लोकांनी सलमान खान याचा राहूल गांधी आणि भारत जोडो अभियानला समर्थन असल्याची टूम उठवली आहे.


अधिक वाचा :

 

Back to top button