मन उडु उडु झालं मालिकेचे मंदार देवस्थळी करणार दिग्दर्शन | पुढारी

मन उडु उडु झालं मालिकेचे मंदार देवस्थळी करणार दिग्दर्शन

मुंबई;पुढारी ऑनलाईन : झी मराठीवरील आगामी मालिका ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी करणार आहेत. या यादीत आघाडीवर असणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी अनेक लोकप्रिय मालिका सादर केल्या आहेत.

मन उडु उडु झालं ही मालिका ३० ऑगस्ट राेजी सांयकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांच्या या मालिकेत मध्यवर्ती भूमिका आहेत.

‘वादळवाट’, ‘अवघाचि हा संसार’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘फुलपाखरू’ या मालिका मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केल्‍या आहेत. या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या . त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

देवस्थळी यांच्या मालिकांमधील प्रेमकथांचा आशय हा नेहमी रंजक असतो. ते पुन्हा एकदा नवी कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

अल्पविरामानंतर ते  पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसले आहेत. गुणी आणि कल्पक दिग्दर्शक म्हणून मंदारकडे पाहिलं जातं. त्यामुळे ही आगामी मालिका प्रेक्षकांचं भरघाेस मनोरंजन करेल, असं म्हणायला हरकत नाही.

मंदार देवस्थळी म्हणाले, “एक वेगळी आणि अतिशय रंजक प्रेमकहाणी आहे. मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस  येत आहोत. प्रेक्षकांचे अत्यंत लाडके कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

तसेच एक गोड आणि फ्रेश लव्हस्टोरी त्यांना पाहायला मिळेल जी पाहताना त्या व्यक्तिरेखांसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करू शकतील. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक भरभरून प्रेम करतील, अशी मी आशा करतो.

हेही वाचलं का ?

Back to top button