लग्न आलिया रणबीरचे, पण कंडोम कंपनीला भलताच आनंद ! हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या | पुढारी

लग्न आलिया रणबीरचे, पण कंडोम कंपनीला भलताच आनंद ! हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अखेर १४ एप्रिलला विवाहबद्ध झाले. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या लग्नाला दोघांच्या फक्त जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. करीना कपूर, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर यांनी लग्नात चांगलीच रंगत आणली.

याशिवाय आलियाची सासू नीतूही खूप सुंदर दिसत होती. आलियाच्या बाजूने महेश भट्ट, पूजा भट्ट, सोनी राजंदन आणि धाकटी बहीण शाहीन भट्टही लग्नाला पोहोचले. आता लग्नानंतर चाहत्यांशिवाय संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री आपापल्या पद्धतीने त्यांचे अभिनंदन करत आहे. इतर भागातील लोकही सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत आहेत.

सोशल मीडियावर एका कंडोम कंपनीनेही अनोख्या पद्धतीने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कंपनीने या जोडप्याचे अभिनंदन केले आणि लिहिले, “डिअर रणबीर-आलिया, मेहफिल में तेरे, हम ना रहे जो, मजा तो नहीं है.”

हे खूप सर्जनशील अभिनंदन होते. खरंतर हे रणबीर कपूरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातील चन्ना मेरेया गाण्याचे बोल आहेत. या जाहिरातीनंतर लोक खूप मजा करत आहेत. काहीजण या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करत आहेत तर काहींनी ‘रणबीरला आता पळून जायचे आहे, त्याला थांबायचे नाही’ असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

लग्नानंतर आलियासोबत सासरच्या घरी कपूर कुटुंबातील काही विधी होतील. रिपोर्ट्सनुसार दोघेही त्यांच्या हनीमूनसाठी दक्षिण आफ्रिकेत जाऊ शकतात. या दोघांकडेही अनेक चित्रपट असून ते शूट करायचे आहेत. लग्नानंतर आलिया भट्ट रणवीर सिंहसोबत तिच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. त्याचवेळी रणबीर कपूर त्याच्या अॅनिमल या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. तर दोघे ब्रह्मास्त्र चित्रपटात एकत्र येणार आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button