

पुढारी ऑनलाइन डेस्क : पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl land scam case) संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्देशानंतर ईडी अधिकाऱ्यांनी आरोपपत्राची प्रत संजय राऊत यांना दिली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी २१ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात (Patra Chawl land scam case) अटक केली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी विशेष न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर ईडीकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. 4 ऑगस्टला ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीच्या अधिका-यांनी Sanjay Raut संजय राऊत चौकशीला सहकार्य करत नाही. असा ठपका ठेवत प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना समन्स बजावला आहे. त्यांची समोरासमोर चौकशी करणे गजरेचे आहे. त्यांची 6 ऑगस्टला चौकशी होणार आहे, असे सांगत राऊत यांना आणखी 10 ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी मिळावी, अशी मागणी केली. तर राजकीय सूड बुद्धीतून ही कारवाई करण्यात येत आहे, राऊत यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत व त्यानंतर १९ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. आज पुन्हा एकदा न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आता बुधवार, २१ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
हेही वाचा :