मणिपुरात जे घडलं तसं कोठेही घडलं नाही : राहुल गांधी

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार
Rahul Gandhi Manipur
राहुल गांधी आज मणिपूरमध्ये पत्रकार परिषद घेतलीPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहूल गांधी मणिपूरच्या दौऱ्यावर असून त्यांनी यादरम्यान आज (दि.८) त्यांनी इंफाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मणिपुरसारखी परिस्थिती भारतात कोठेही घडली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi Manipur
Rahul Gandhi Visit to Manipur : राहूल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यातील अडथळा दूर; हेलिकॉप्टरने चुरचंदपूरला रवाना

राहूल गांधी म्हणाले, मणिपूरचा वाद सुरू झाल्यापासून मी तिसऱ्यांदा मणिपूरमध्ये आलो आहे. इथल्या जनतेशी मी संवाद साधला असून त्यांच्या वेदना मी जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी मी इथे आलो आहे. जनतेशी संवाद साधल्यानंतर मला जाणवले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची खरचं गरज आहे. तसेच हिंसाचाराने इथल्या लोकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. मणिपूरसारखी परिस्थिती भारतात कुठेही घडलेली मी पाहिलेले नाही.

Rahul Gandhi Manipur
राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, माझे याबाबत राज्यपालांशी बोलणे झाले असून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.यावर मी राजकरण करणार नाही. मणिपूरच्या जनतेला जेव्हा माझ्या आणि काँग्रेसच्या मदतीची गरज असेल, तेव्हा मी तुमच्या पाठीशी राहू, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news