Operation Sindoor | भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे काँग्रेसकडून कौतुक

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली.
Operation Sindoor
Operation Sindoor file photo
Published on
Updated on

Operation Sindoor |

दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर हा एकता आणि एकतेचा काळ आहे. भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य आणि निर्धाराचे मनापासून कौतुक आहेत. काँग्रेस पक्ष सशस्त्र दलांसोबत खंबीरपणे उभा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेस सशस्त्र दलांसोबत खंबीरपणे उभा

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश म्हणाले की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाच्या सर्व स्रोतांचा पूर्णपणे नायनाट करणे ही भारताची ठाम राष्ट्रीय भूमिका असली पाहिजे, आणि ती सदैव सर्वोच्च राष्ट्रीय हिताच्या प्रेरणेनेच ठरली पाहिजे. रमेश म्हणाले, “हा एकतेचा आणि एकजुटीचा काळ आहे. २२ एप्रिलच्या रात्रीपासूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हे स्पष्ट केलं आहे की पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या कारवाईला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. काँग्रेस पक्ष आपल्या सशस्त्र दलांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.”

Operation Sindoor
Live Updates | Operation Sindoor : पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट, ऑपरेशन सिंदूरबद्दल दिली माहिती

भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे मनापासून कौतुक : खर्गे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात भारताची भूमिका ठाम असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “आपल्या भारतीय सशस्त्र दलांवर आम्हाला अभिमान आहे. त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यांच्या शौर्य आणि निर्धाराचे आम्ही मनापासून कौतुक करतो.” पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस पक्ष सीमा पारच्या दहशतवादाविरोधातील निर्णायक कारवाईसाठी सशस्त्र दलांशी आणि सरकारसोबत खंबीरपणे उभा असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले. “राष्ट्रीय एकता आणि एकजूट ही काळाची गरज आहे. काँग्रेस नेहमीच सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी राहिली आहे. आमच्या नेत्यांनी अतीतामध्ये मार्गदर्शन केले असून आमच्यासाठी राष्ट्रीय हित हेच सर्वोच्च आहे,” असे खर्गे म्हणाले.

९ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यात बहावलपूरचा जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि लष्कर-ए-तोयबाचा मुरीदके तळ यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news