नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. यामध्य़े भाजपला 291 जागा मिळण्याची शक्यता आहे. या वेळी दिल्ली येथील मुख्यालयात जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले. रेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत. आमच्यासाठी आजचा दिवस खुप महत्वाचा आहे. एवढेमोठे यश मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. मोदींनी कायम सर्वप्रथम देश आणि लोकांना ठेवले आहे. याबरोबरच लोकांनी पंतप्रधान मोदींना आणखी एक संधी दिली त्याबद्दल मी भाजपकडून सर्व मतदारांचे आभार मानतो. असे प्रतिपादन त्यांनी केले. या बरोबरच नरेंद्र मोदी येत्या 20 दिवसात देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :