Railway: तुमची ट्रेन चुकली? तिकीट रद्द केले? आता टेन्शन नाही! एकही पैसा कापला जाणार नाही! रेल्वेचा नवा नियम काय आहे?

Indian Railways new rules: भारतीय रेल्वे लवकरच आपल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल लागू करण्याच्या तयारीत आहे.
Railway
Railwayfile photo
Published on
Updated on

Railway

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे (Indian Railways) लवकरच आपल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल लागू करण्याच्या तयारीत आहे. या नवीन नियमानुसार, आता प्रवाशांना त्यांच्या ट्रेन प्रवासाची तारीख बदलताना कोणतेही रद्द शुल्क भरावे लागणार नाही. तिकीट कन्फर्म असल्यास, दंड न भरता प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा लवकरच प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या पोर्टलद्वारे ही नवीन सुविधा कार्यान्वित केली जाईल. या नवीन योजनेमुळे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटावर प्रवासाची तारीख बदलता येईल आणि तिकीट भाड्यात काही फरक असल्यास, तो अतिरिक्त शुल्क म्हणून भरावा लागेल, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

प्रवाशांना काय होणार फायदा?

हा निर्णय ट्रेन प्रवासाला अधिक लवचिक, सोयीस्कर आणि परवडणारा बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे. अनेकदा प्रवाशांच्या योजनांमध्ये अचानक बदल होतो किंवा काही आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन चुकते. अशा वेळी संपूर्ण तिकीट भाड्याचे नुकसान होत असे. नवीन प्रणालीमुळे प्रवाशांची ही समस्या सुटणार आहे.

Railway
Donald Trump: पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी चांगले काम केले'; पाहा पुढे काय झाले... व्हिडिओ व्हायरल

सध्याचे नियम काय आहेत?

  • सध्या प्रवाशाची ट्रेन चुकल्यास परतावा मिळत नाही.

  • तिकीट रद्द करताना, रद्द शुल्क तिकीट भाड्याच्या 25 ते 50 टक्के इतके कापले जाते.

  • उदाहरणार्थ, जर एखादे कन्फर्म तिकीट ट्रेन सुटण्याच्या चार तासांपेक्षा कमी वेळेत रद्द केले, तर प्रवाशाला कोणताही परतावा मिळत नाही.

Railway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला लातूरमध्ये उत्तम प्रतिसाद

नवीन प्रणाली कसे काम करणार?

नवीन प्रणाली लागू झाल्यावर प्रवाशांना तिकीट रद्द करून दंड भरण्याची गरज भासणार नाही. याऐवजी ते त्यांच्या प्रवासाची तारीख बदलू शकतील.

प्रवाशांना IRCTC वेबसाइट किंवा ॲपवर लॉग-इन करून बुक केलेले तिकीट निवडावे लागेल आणि सीट उपलब्ध असल्यास, दुसरी तारीख किंवा दुसरी ट्रेन निवडण्याचा पर्याय मिळेल. यासाठी आवश्यक असलेले एकमेव पेमेंट म्हणजे दोन तिकिटांच्या भाड्यातील फरक असेल. यामुळे प्रवाशांना आर्थिक नुकसानीची चिंता न करता त्यांचा प्लॅन बदलता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु ही सुविधा पुढील वर्षाच्या सुरुवातीस लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news