Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला लातूरमध्ये उत्तम प्रतिसाद

लातूर जिल्ह्यातील औसा, रेणापूर, लातूर तालुक्यांतून जाणार महामार्ग
Shaktipeeth Highway |
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला लातूरमध्ये उत्तम प्रतिसादFile Photo
Published on
Updated on

Great response in Latur to joint survey of Shaktipeeth Highway

लातूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर गोवा शक्तीपीठ शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग उभारणीला आता राज्यभरातून गती मिळत आहे. ज्या जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्या जिल्ह्यांतील शेतकरी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संयुक्त मोजणीला उत्तम प्रतिसाद दर्शवत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर, सांगली येथील शेतकऱ्यांनी संयुक्त जमीन मोजणीसाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाला सहमती दर्शवत चांगला प्रतिसाद दर्शविला. यामुळे या भागांमधील महामार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला गती मिळत आहे. याच पद्धतीने लातूर येथील शेतकऱ्यांनी देखील संयुक्त जमिनीच्या मोजणीच्या प्रक्रियेत सहभाग दर्शविला आहे. यामुळे हळूहळू येथील कामाला देखील गती मिळताना दिसून येत आहे.

Shaktipeeth Highway |
Illegal Sand Extraction : वाळू तस्कर, कारवाईचे गौडबंगाल उलगडेना प्रशासन-तक्रारदार दोन्हीवरही संशय?

जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाचा ४३.१७ किमी लांबीचा मार्ग जातो. यामध्ये जिल्ह्यातून लातूर, रेणापूर, औसा या तालुक्यांतील २२ गावांमधून हा मार्ग जात आहे. येथील बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकतीच संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतःहून प्रक्रियेत सहभाग घेऊन त्यांच्या जमीन मोजणीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले.

शेतकऱ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे विविध जिल्ह्यांमधे महामार्गाच्या उभारणीबाबत एक सकारात्मक चित्र देखील समोर येत आहे. लातूर तालुक्यातून महामार्गाचा एक मोठा भाग जात आहे. याबाबत लातूरच्या उपविभागीय अधीकारी रोहिणी नन्हे वीरोळे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाचा महत्वाचा टप्पा लातूर तालुक्यातील १३ गावांमधून जाणार आहे. साधारण २६ किमी लांबीचा भाग लातूर तालुक्यातून जाणार आहे. तर यासाठी २७५ हेक्टर जागा संपादन करावी लागणार आहे. संयुक्त जमीन मोजणीच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले संभ्रम दूर करण्यात आले. तसेच या महामार्गाचे फायदे देखील शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.

Shaktipeeth Highway |
Latur Rain : अतिवृष्टीच्या अंधारात औसा मतदारसंघात आशेचा दीप
दळणवळणाची साधने जो पर्यंत सशक्त होऊ शकत नाहीत, तो पर्यंत खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही. समृद्धी महामार्गानंतर आता शक्तीपीठ महामार्ग आता लातूर जिल्ह्यांतून जात आहे. लातूर, रेणापूर, औसा या तालुक्यांतील २२ गावांमधून हा मार्ग जात आहे. संयुक्त मोजणी हा त्यातील महत्वाचा भाग असतो. शेतकऱ्यांच्या समोर त्यांच्या शेतातील झाडे, विहीर आणि साधनसंपत्ती यांची मोजणी होणे हा संयुक्त मोजणीतील महत्वाचा भाग असतो. तर यामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधील समन्वय वाढतो आणि सुसंवाद देखील वाढतो आणि विश्वासाहर्ता निर्माण होते. संयुक्त मोजणीच्या प्रक्रियेतील हा महत्वाचा गाभा असतो. यामुळे माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे या महामार्गाच्या उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीचे काम मजलदगतीने होईल.
वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हाधिकारी - लातूर
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग लातूर जिल्ह्यांतून जात आहे. यामध्ये औसा तालुक्यातील चार गावे, रेणापूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. आपले गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य यांच्या विकासासाठी दळणवळणाची साधने खूप महत्वाचे आहे. माझ्या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की शेतकऱ्यांनी संयुक्त जमीन मोजणीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. शेतकऱ्यांमध्ये याबाबत कोणतेही संभ्रम असतील शंका असतील तर यासाठी प्रशासन सदैव उपलब्ध आहे. देशाच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या या प्रकल्प पूर्ण करण्याचा आपण सर्वजण संकल्प करूया.
अविनाश कोरडे, उपविभागीय अधिकारी -लातूर
माझ्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जात असून यासाठीची संयुक्त जमीन मोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. आमच्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे ही चांगली बाब आहे. गावात आणि जिल्ह्यात दळणवळनाची साधन उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. देशाच्या नकाशावर यामुळे आमच्या गावाचे होईल. यामुळे येथे पायाभूत सुविधा होतील तसेच रोजगार उपलब्ध होतील.
व्यंकटेश ढोणे, शेतकरी, गातेगाव - लातूर
माझ्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. काही आठवड्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जमिनीची संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. यासाठी मी संमती दर्शविली होती. हा महामार्ग होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी हा महामार्ग महत्वाचा ठरेल. लातूर जिल्ह्यात दळणवळणाची मोठी सोय उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्याचा शेतमाल बाजारपेठेत
पोहचविण्यास मदत होईल. अजय बनसोडे, शेतकरी - चिंचोली, लातूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news