नालंदा विद्यापीठात आयुर्वेद, बौद्धधर्म, गणित, व्याकरण, अवकाशशास्त्र, भारतीय अर्थशास्त्र असे विषय शिकवले जात होते. ८ व्या आणि ९ व्या शतका पल राज्यांच्या कारकिर्दीत या विद्यापीठाने मोठा नावलौकीक मिळवला होता. गणित आणि अवकाशशास्त्र या दोन विषयात या विद्यापीठाने जगभर नाव कमावले होते. शुन्याची संकल्पान मांडणारे आर्यभट्ट ६व्या शतकात या विद्यापीठात शिकवत असत.