Lok Sabha Election : यावेळी सर्वाधिक महिला रिंगणात

Lok Sabha Election
Lok Sabha Election

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुका हे एक वैश्विक आश्चर्य मानले जाते. राजकीय चुरस एवढी वाढली आहे की, आता कोणीच थांबायला तयार नाही पक्षांची संख्याही वाढली आहे. नवनव्या आघाड्याही तयार होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार थांबायला तयार नाहीत. पाच वर्षांनंतर संधी मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने उमेदवार मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. त्यातूनच उमेदवारांची संख्या वाढली आहे.

निवडणूक आयोगाच्या एका अहवालानुसार 1996 नंतर प्रथमच उमेदवारांची संख्या वाढली आहे. यंदा 8 हजार 360 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत (2019) 8 हजार 39 जणांनी लोकसभा निवडणुकीत आपले नशीब आजमवले होते. तर 1996 च्या निवडणुकीत 543 जागांसाठी तब्बल 13 हजार 952 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी झालेल्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदार संघांमध्ये सर्वाधिक 1 हजार 717 उमेदवार रिंगणात होते.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 19 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 मतदार संघांमध्ये 1 हजार 625 उमेदवार होते. 26 एप्रिल रोजी झालेल्या दुसर्‍या टप्प्यात 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 89 मतदार संघांमध्ये 1 हजार 198 उमेदवार, 7 मे रोजी झालेल्या तिसर्‍या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 मतदार संघांमध्ये 1 हजार 352 उमेदवार आणि 20 मे रोजी झालेल्या पाचव्या टप्प्यात 49 मतदार संघांमध्ये 695 उमेदवार होते. आता सहावा टप्पा 25 मे, तर सातवा टप्पा 1 जून रोजी होणार आहे. सहाव्या टप्प्यात 869, तर सातव्या टप्प्यात 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news