पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या २४ तासांत भारतात ६०५ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या ४००२ पर्यंत पोहचली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (New Corona Cases)
गेल्या २४ तासांतील आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमधील दोन आणि कर्नाटक आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४४,४८१,३४१ वर गेली आहे. रविवारी (दि.७) सकाळपासून रविवारी सकाळपासून कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांमध्ये ६४८ ची वाढ झाली आहे. (New Corona Cases)