काही महिन्यांपुर्वी कर्नाटक जिंकल्यानंतर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सरकार बनवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न होते. मात्र काँग्रेसला यात यश आले नाही. तेलंगणा वगळता अन्य तीनही राज्य भाजपने जिंकले. निवडणुकीपूर्वी पाचही राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक बोलावून लोकसभेतील जागा वाटपाबद्दल चर्चा होईल, अशा बातम्या होत्या. दरम्यान, विविध राज्यांमध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळवल्यास लोकसभेत जागा वाटपात काँग्रेसचे भाव वधारण्याची शक्यता होती. आता या शक्यतेचे काय होणार हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सहा डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक नवी दिल्लीत बोलवली आहे.