२००७ साली पहिल्यांदा ते आंध्र प्रदेश विधानसभेत अपक्ष आमदार निवडून गेले. २००९ मध्ये तेलगू देसम पार्टीमधून लढत वरिष्ठ काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर तेलगू देसम पार्टीच्या वतीने रेवंथ रेड्डी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र २०१७ मध्ये तेलगू देसम पार्टीने पदावरून हटवल्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.