Andhra train accident : आंध्र प्रदेश रेल्वे अपघात; मृतांचा आकडा १३ वर
पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन रेल्वे गाड्यांची धडक रविवारी (दि.२९) रात्री झाली. या भीषण अपघातातातील मृतांचा आकडा १३ वर गेला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले की, विशाखापट्टणम-पलासा आणि विशाखापट्टणम-रायगड या दोन रेल्वेंमध्ये धडक झाली. विजयनगरम एसपी दीपिका यांनी सांगितले की, मृत १३ पैकी सात जणांची ओळख पटली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Andhra train accident)
Andhra train accident : मृतांचा आकडा वाढू शकतो
माहितीनुसार, विशाखापट्टणम-पलासा आणि विशाखापट्टणम-रायगड या दोन रेल्वेंमध्ये रविवारी रात्री (दि.२९) धडक झाली. या अपघातात तीन डब्यांचा चक्काचुर झाला. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य तात्काळ सुरु केले. ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ०८५३२) विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरला (ट्रेन क्रमांक ०८५०४) धडकली. या घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो.
#UPDATE | Andhra Pradesh train accident: So far 13 people have died, out of which 7 have been already identified and the process to identify bodies is underway: Deepika, Vizianagaram SP https://t.co/1JCN3Yl83f
— ANI (@ANI) October 30, 2023
#WATCH | Andhra Pradesh train accident: Latest ANI drone cam footage shows heavy cranes in action as restoration work is underway.
According to Vizianagaram SP, 13 people have died in the accident. pic.twitter.com/R8XXxOAY6J
— ANI (@ANI) October 30, 2023
हेही वाचा
- Maharashtra-Karnataka border row: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी
- Manoj Jarange: मला बोलता येत आहे, तोपर्यंतच चर्चेला या: मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांना आवाहन
- जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवालीत चर्चेसाठी यावे, त्यांना कुणीही अडवणार नाही : मनोज जरांगे-पाटील