महिला आरक्षणाचं स्वागत, पण ओबीसींचे काय? : राहुल गांधी
पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसीसाठी मोदी सरकारने काय केले? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ओबीसींसाठी बजेटमध्ये फक्त ५ टक्के तरतूद आहे. देशात ओबीसी लोकसंख्या किती, मोदी सरकारने स्पष्ट करावं. ३३ वर्षात ओबीसीमधून फक्त ३ सचिव झाले.
राहुल गांधी म्हणाले, महिला आरक्षणाचं स्वागत आहे. पण ओबीसींचे काय? महिला आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिलाच. पण लक्ष विचलित करण्यासाठी महिला आरक्षण आणलं गेलं. ओबीसींचा विकास हा केवळ मोदींचा खोटा दावा आहे. भाजपचे खासदार म्हणजे फक्त पुतळे, त्यांना अधिकार नाहीत. ओबीसी जनगणना करा. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी राहुल गांधींनी यावेळी मागणी केली.
- Adah Sharma : अदा शर्मा लालबागच्या राजाच्या चरणी, शंखनाद करत घेतलं दर्शन (Video)
- मुंबई : गणेश विसर्जनाला ५५ देशांच्या राजदूतांची उपस्थिती असणार
- Pune Sky walk : पुण्यात आता ‘या’ ठिकाणी उभारणार ग्लास स्कायवॉक; अजित पवारांचं 100 कोटींचं गिफ्ट
#WATCH | Women’s Reservation Bill | Congress MP Rahul Gandhi says, “What is it that you are being diverted from? From OBC Census. I spoke of one institution in Parliament, that which runs the Government of India – Cabinet secretary and secretaries…I asked why only three out of… pic.twitter.com/6WVKGgYXb8
— ANI (@ANI) September 22, 2023