जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याचा मोठा कट उधळला, पाच दहशतवादी जेरबंद
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज ( दि. १२) बडगाममध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला असून, पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. जेरबंद केलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.
सूत्रांनी सांगितले की, बडगामच्या खाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली. पथकाने कारवाई केली तेव्हा या पाचही जणांना लपून बसून अटक करण्यात आली.
या पाच जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा आणि अमरनाथ यात्रा उधळण्याचा कट रचला होता, असे तपासात समोर आले आहे. रौफ अहमद, हिलाल मलिक, तौफिक दार, दानिश अहमद आणि शौकत अली अशी पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत पकडलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
हेही वाचा :
- Swati maliwal: ‘पुरावे असूनही बृजभूषण यांना अद्याप अटक का नाही?’ – स्वाती मालीवाल
- Hand Chopping Case: केरळमध्ये प्राध्यापकांवर प्राणघातक हल्ला, NIA न्यायालयाने ६ जणांना ठरवले दोषी
- Tomato Price : टोमॅटो दर नियंत्रणासाठी केंद्राने घेतला माेठा निर्णय, आता…