Article 370 : कलम ३७० रद्द विरोधातील याचिकांवर २ ऑगस्टपासून सुनावणी

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याला आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने येत्या 27 तारखेपर्यंत सर्व पक्षकारांकडून मत मागविले आहे. त्यानंतर नियमित सुनावणी 2 ऑगस्टपासून घेतली जाईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले.

कलम 370 संदर्भातील याचिकांवर आपले म्हणणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे, त्यावर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. पक्षकारांकडून 27 तारखेपर्यंत जी प्रतिज्ञापत्रे दाखल करतील, ती अंतीम असतील, त्यात पुन्हा सुधारणा करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कलम 370 ला आव्हान घेणाऱ्या याचिकांवर सोमवार आणि शुक्रवार वगळता इतर सर्व कामकाजी दिवसांत दररोज सुनावणी घेतली जाणार आहे. तर सुनावणीवेळी मदतीसाठी नोडल वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान आयएएस अधिकारी शाह फैसल यांच्या वकिलांनी आपले अशिल याचिका मागे घेत असल्याचे सांगितले. न्यायालयाकडून ही विनंती मान्य करण्यात आली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news