अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारबरोबर हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्या गटाच्या प्रफुल्ल पटेल यांची देखील मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून किमान दोन मंत्रीपदे निश्चित आहेत, मात्र तसे करीत असताना दोन मंत्रीपदे जाण्याचीही शक्यता आहे. चालूवर्षीच्या अखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळातील वरील राज्यांचे प्रतिनिधित्व वाढविले जाणार असल्याचे समजते.